शिरूर तालुक्यात ७०० हेक्टरवर एमआयडीसीचा प्रस्ताव; मावळातही ४०५ हेक्टर औद्योगिक क्षेत्राची तयारी

शिरूर तालुक्यात ७०० हेक्टरवर एमआयडीसीचा प्रस्ताव; मावळातही ४०५ हेक्टर औद्योगिक क्षेत्राची तयारी

 

Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे 

पाबळसह बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी परिसरात औद्योगिक विस्ताराला चाचाकण औद्योगिक परिसरातील वाढता औद्योगिक विस्तार, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांवरील वाढता ताण लक्षात घेता मावळ तालुक्यातील तळेगाव परिसरात नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी या तीन गावांच्या हद्दीत सुमारे ११०० एकर म्हणजेच जवळपास ४०५ हेक्टर क्षेत्रावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी प्राथमिक सर्वेक्षण आणि जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत पुढील टप्पा म्हणून एमआयडीसीने कलम ३२(२) अंतर्गत जमिनीच्या दरनिश्चितीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. शासनाकडून येत्या दोन ते तीन महिन्यांत जमिनीचे दर निश्चित होण्याची शक्यता असून त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे या प्रकल्पाच्या पुढील हालचाली शासनाच्या दरनिश्चितीच्या निर्णयावर अवलंबून आहेत.

प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी तीन गावांमधून वेगवेगळ्या प्रमाणात जमीन संपादित करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये ब्राह्मणवाडी येथून सुमारे १८३ हेक्टर, करंज येथून १३५ हेक्टर आणि बऊर येथून सुमारे ८७ हेक्टर जमीन घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे संबंधित गावांमधील जमीनधारकांचे लक्ष आता शासनाकडून निश्चित होणाऱ्या जमिनीच्या दराकडे लागले आहे.

गेल्या काही वर्षांत चाकण औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहिले असून त्याचा परिणाम परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. उद्योगांची संख्या, मालवाहतूक करणारी अवजड वाहने आणि कामगारांची वाढती वर्दळ यामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचबरोबर विद्यमान औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांवरही वाढता ताण पडत असून उद्योगांच्या भविष्यातील विस्तारासाठी उपलब्ध जागेची मर्यादा जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर तळेगाव परिसरातील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राकडे पर्यायी औद्योगिक विस्ताराचे ठिकाण म्हणून पाहिले जात आहे.

तळेगाव परिसराला पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग तसेच प्रमुख महामार्गांची जोडणी असल्याने प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राला दळणवळणाच्या दृष्टीने फायदा होण्याची शक्यता आहे. उद्योगांसाठी आवश्यक असलेली कच्च्या मालाची वाहतूक, तयार मालाची ने-आण आणि इतर व्यावसायिक वाहतूक या दृष्टीने चांगली रस्ते जोडणी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास चाकण परिसरावरील औद्योगिक दबाव काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील पाबळ येथेही सुमारे ७०० हेक्टर क्षेत्रावर नवीन एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित क्षेत्राची मोजणी लवकरच सुरू होणार असून त्यानंतर भूसंपादनासह इतर प्रशासकीय प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. मावळ आणि शिरूर तालुक्यातील या दोन्ही प्रस्तावांमुळे पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात आगामी काळात औद्योगिक विस्ताराला चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्र उभारणीसाठी भूसंपादन, शासनाची मंजुरी, पायाभूत सुविधांचा विकास आणि इतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे महत्त्वाचे ठरणार आहे.लना; भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *