March 10, 2026 3:06 am

Advertisements
विशेष बातम्या

वडगाव रासाई येथे जागतिक महिला दिन साजरा; भिल्ल समाजातील महिलांना जातीचे दाखले

वडगाव रासाई येथे जागतिक महिला दिन उत्साहात; क्रांती संस्थेमार्फत भिल्ल समाजातील महिलांना जातीचे दाखले व सन्मान वडगाव रासाई (ता. शिरूर) / प्रतिनिधी – विजय कांबळे वडगाव रासाई येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांती संस्थेच्या पुढाकाराने भिल्ल समाजातील महिलांना जातीचे दाखले देत त्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक जागरूकता, हक्कांची जाणीव आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवण्यात आले. हा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक

राजकारण

पुणे–अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्गाला अखेर गती; २२०० कोटींच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी, प्रवास होणार अवघ्या ३ तासांत

पुणे–अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्गाला अखेर गती; २२०० कोटींच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी, प्रवास होणार अवघ्या ३ तासांत अल्लाउद्दीन अलवी | पुणे जिल्हा प्रतिनिधी | ता. २५ पुणे ते अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर या महत्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाच्या कामाला अखेर केंद्र व राज्य शासनाने वेग दिला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी खराडी जंक्शन ते शिरूर बायपास या सुमारे ५५.४ किलोमीटर अंतराच्या कामास सुमारे २२०० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकीय खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. हा महामार्ग ग्रीनफिल्ड पद्धतीने उभारण्यात येणार असून सहा लेन एलिव्हेटेड रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात पुणे ते संभाजीनगर हा प्रवास

मत आणि मतभेद

दुःखद घटनेचा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम; लोकशाहीचा सन्मान राखत मतदान तारखेत बदल

दुःखद घटनेचा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम; लोकशाहीचा सन्मान राखत मतदान तारखेत बदल प्रतिनिधी- विकास साळुंके Rjnews27marathi राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय जीवनावर परिणाम करणाऱ्या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. लोकशाहीची प्रक्रिया अबाधित ठेवत, शासकीय शिष्टाचार व संवेदनशीलतेचा आदर राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदान व मतमोजणीच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. या कालावधीत कोणतेही शासकीय, सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचा निर्णय झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर त्याचा थेट परिणाम झाला.