शेजाऱ्यांचा अमानुष हल्ला – शिरूर तालुक्यात न्हावरे गावात जमिनीच्या वादातून महिलांवर प्राणघातक हल्ला,

शेजाऱ्यांचा अमानुष हल्ला – शिरूर तालुक्यात न्हावरे गावात जमिनीच्या वादातून महिलांवर प्राणघातक हल्ला, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या; गावात संतापाची लाट

शिरूर, पुणे – प्रतिनिधी

शहरांइतकीच आता ग्रामीण भागातही कुरघोड्या, मनोमालिका आणि वैयक्तिक भांडणं टोकाला जात असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक थरारक आणि धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात घडली आहे. एका जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून शेजाऱ्यांनी संपूर्ण कुटुंबावरच हल्ला करत महिलांना अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली असून, महिलांवर काठीने, ऊसाच्या टिपऱ्याने हल्ले करण्यात आले. इतक्यावर न थांबता “पुन्हा आमच्या नादाला लागलात, तर चेंदामेंदा करून टाकीन” अशा शब्दांत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

 

काय आहे संपूर्ण हकीकत?

फिर्यादी महेश हनुमंत देशमुख (वय 30 वर्षे, व्यवसाय शेती, रा. न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दिनांक 03 जून 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6:15 वाजता, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या त्रिंबक दादाभाऊ हिंगे, कमल त्रिंबक हिंगे, साधना शंकर देशमुख आणि यशश्री सचिन हिंगे (सर्व रा. न्हावरे) यांनी शेतजमिनीच्या वाटपावरून त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला चढवला.

यावेळी महेश देशमुख यांच्या पत्नी कांचन, बहिण रूपाली, मावस बहिण प्रियंका बाळासाहेब जगदाळे आणि आई मंदा देशमुख या सर्व महिलांवर एकत्रितपणे हल्ला करण्यात आला.

महिलांवर क्रूर हल्ला – अंगावर शहारे आणणारा प्रकार

कमल हिंगे हिने हातातील ऊसाच्या टिपऱ्याने महेश देशमुख यांच्या पाठीवर जोरदार मारहाण केली.

साधना देशमुख आणि त्रिंबक हिंगे यांनी प्रियंका आणि रूपाली यांच्या केसांना धरून फरफटत नेले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यानंतर त्रिंबक हिंगे याने हातातील लाकडी काठीने महेश देशमुख यांच्या आई मंदा देशमुख यांना हातावर जोरात मारले, ज्यात त्यांना दुखापत झाली.

त्याचप्रमाणे प्रियंका हिला देखील डोक्यावर आणि उजव्या हातावर काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले.

इतक्यावरच न थांबता आरोपीने “तुम्ही पुन्हा आमच्या नादाला लागलात तर तुमचा चेंदामेंदा करून टाकीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

कायदेशीर कारवाई सुरू

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 380/2025 नुसार भारतीय दंड विधान कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ बनकर करीत असून, गुन्हा पो.हवा. कळमकर यांनी नोंदवला आहे. प्रकरणाचे प्रभारी अधिकारी श्री. चिवडशेट्टी सौ. शिरूर हे आहेत.

गावात संताप – महिलांवरील हिंसाचारावर रोष

सदर घटनेने न्हावरे गावात खळबळ उडाली आहे. महिलांवर सार्वजनिक ठिकाणी शारीरिक हल्ला होणे, शिवीगाळ आणि धमकी देणे, हे सगळे प्रकार केवळ गुन्हेगारी मानसिकतेचे द्योतक आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जखमींवर उपचार सुरू

हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्यावर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. पीडित कुटुंब मानसिकदृष्ट्याही हादरले असून, त्यांना योग्य न्याय मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

न्यायासाठी हाक – प्रशासनाचे लक्ष लागल

महिला सुरक्षिततेच्या बाबतीत ग्रामस्तरावर जर अशी स्थिती असेल, तर ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. शासन व पोलीस प्रशासनाने या प्रकरणात निष्पक्ष आणि प्रभावी भूमिका घेतली नाही, तर अशा घटनांची पुनरावृत्ती होणारच, असा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

(RJNEWS27MARATHI.COM)
ही घटना म्हणजे केवळ एका कुटुंबावरचा हल्ला नसून, संपूर्ण ग्रामीण भागातील महिला सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह आहे. आता प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *