शिरुरमध्ये जमीन वादातून भांडण, चुलत भावावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार

शिरुरमध्ये जमीन वादातून भांडण, चुलत भावावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार

शिरुर (ता. पुणे) – शिरुर तालुक्यातील कुरूळी देशमुख वस्ती येथे जमीन वादातून चुलत भावावर बांबूच्या काठीनं मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शिरुर पोलिसांनी केरभाऊ विष्णू बोरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराची माहिती:
या प्रकरणी मच्छीद्र विनायक बोरकर (वय ५६ वर्षे, व्यवसाय – शेती, रा. कुरूळी देशमुख वस्ती, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

घटना कशी घडली?
दि. २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तक्रारदार त्यांच्या राहत्या घरी असताना, त्यांच्याच शेतात काम करणाऱ्या मजुर राजश्री शेलार यांनी त्यांना फोन करून सांगितले की केरभाऊ विष्णू बोरकर हे दारूच्या नशेत शेतात येऊन मजुरांना त्रास देत आहेत आणि कांदे काढण्यास मनाई करत आहेत. हे ऐकताच तक्रारदार स्वतः शेतात पोहोचले.

शेतात गेल्यावर तक्रारदाराने चुलत भाऊ केरभाऊ याला विचारले की, काय झाले आहे? त्यावर आरोपीने तक्रारदारावर आरोप केला की, “तू माझी जमीन हडप करत आहेस.” त्यावेळी तक्रारदाराने समजावून सांगितले की, “तू तुझ्या जमिनीची मोजणी करून घे आणि हद्द निश्चित करून घे.” यावरून संतापून आरोपीने आपल्या हातात असलेल्या बांबूच्या काठीनं तक्रारदाराच्या डाव्या मनगटावर मारले, खाली पाडले आणि उजव्या गालावर चावा घेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलीस कारवाई:
या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६५/२०२५ नोंदवण्यात आला असून आरोपी केरभाऊ विष्णू बोरकर याच्यावर भारतीय दंड विधान कलम ११८(१), ३५१(२)(३), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गवळी (बॅ. नं. २२७१) करत असून प्रभारी अधिकारी म्हणून मा. संदेश केंजळे हे कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *