January 19, 2026 2:18 am

गावातील चोरीला आळा घालण्यासाठी शिरूर पोलिसांची महत्त्वपूर्ण पावले!

 

गावातील चोरीला आळा घालण्यासाठी शिरूर पोलिसांची महत्त्वपूर्ण पावले!

पोलीस-पंचायत समन्वयातून ग्रामसुरक्षा यंत्रणा व CCTV बसविण्यावर भर

शिरूर, ता. ७ जुलै २०२५ –

गावांमध्ये वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांना आळा बसावा, गावकऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच पोलीस-पत्रकार-ग्रामप्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट व्हावा यासाठी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

ही बैठक आज दुपारी १२.३० ते १.४० दरम्यान, मा. श्री. प्रशांत ढोले साहेब (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीला पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले:

1. ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी अंमल:
प्रत्येक गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. पोलिसांनी यंत्रणेचे कार्य आणि तिच्या मदतीने चोरी कशी रोखता येते याचे सविस्तर मार्गदर्शन केले. पोलीस पाटील, सरपंच, ग्रामस्थ यांनी या यंत्रणेला एकत्रितपणे सक्रिय करावे, असे आवाहन करण्यात आले.

2. ग्राम सुरक्षा दलाचे सक्रीय कार्य:
प्रत्येक गावात असलेल्या ग्राम सुरक्षा दल यांना अधिक सक्रीय करून दररोज रात्री टप्प्याटप्प्याने गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे संभाव्य चोरट्यांना गावात वावरणे कठीण होईल.

3. CCTV कॅमेऱ्यांची अंमलबजावणी:
गावाच्या मुख्य प्रवेशद्वार, बाजारपेठ, शाळा आणि संवेदनशील ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याबाबत उपाययोजना कराव्यात. यामुळे चोरीच्या घटनांमध्ये घट होईल आणि तपासात मदत होईल.

4. सक्षम यंत्रणा निर्माण करणे:
गावातील सुरक्षेसाठी ग्राम सुरक्षा दल व ग्रामसुरक्षा यंत्रणा यांना अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले गेले. यासाठी योग्य नियोजन, आर्थिक सहाय्य, आणि स्थानिक सहभाग यांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.

 

या बैठकीमध्ये गावकऱ्यांनी देखील आपले मत मांडले आणि पोलीस प्रशासनाच्या उपक्रमाचे कौतुक करत, सहकार्याचे आश्वासन दिले. हा उपक्रम ग्रामस्तरावर लोकसहभागातून यशस्वी झाल्यास, भविष्यात इतर विभागांनाही मार्गदर्शक ठरेल, असे उपस्थितांचे म्हणणे होते.

ग्राम सुरक्षा हे आपल्या सर्वांचे उत्तरदायित्व आहे!”

असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी करत, ग्राम सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन गावांचे रक्षण करावे, असे आवाहन केले.

 

बातमीसाठी संपर्क:
शिरूर पोलीस स्टेशन
(संवाददाता – RJNEWS27MARATHI.COM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें