June 15, 2025 8:12 am

निसर्गाचा कोप: वाढत्या तापमानाने जनजीवन विस्कळीत


निसर्गाचा कोप: वाढत्या तापमानाने जनजीवन विस्कळीत

संपादक

आंधळगाव फाटा- मांडवगण फराटा

सध्या एप्रिल महिना अखेरीस येत असतानाच उन्हाळ्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मे महिन्याची सुरुवात होण्याआधीच नागरगाव आणि परिसरातील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल सुरू झाले असून, अनेक ठिकाणी उष्माघाताची लक्षणे आणि विविध आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत.

रस्त्यांवर शुकशुकाट, बाजारपेठा ओसाड

उष्णतेच्या कडाक्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते आणि बाजारपेठा सुनसान झाल्या आहेत. गरजेपोटी बाहेर पडणाऱ्यांनाही छत्री, अंगरखा आणि पाण्याची बाटली घेऊनच घराबाहेर पडावे लागत आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक, तसेच दिवसभर उन्हात काम करणाऱ्या श्रमिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे अशी लक्षणे सर्वत्र दिसून येत आहेत.

झाडांची तोड आणि पावसाची कमी झाली संकटाची कारणे

निसर्गाच्या असंतुलनाचा फटका आता अधिक जाणवू लागला आहे. अलीकडील वर्षांत झाडांची अमानुष तोड झाल्याने सावलीची जागा कमी झाली आहे. यासोबतच, कमी पावसामुळे जमिनीचे आणि हवामानाचे तापमान प्रचंड वाढले आहे. परिणामी उष्णतेचा कहर अधिकच तीव्र झाला आहे.

नागरिकांना आरोग्य तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

सध्याच्या परिस्थितीत आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शक्यतो दुपारच्या वेळात बाहेर जाणे टाळावे, घरात थंड हवेत राहावे, व थंड पाण्याने आंघोळ करून त्यानंतर कोमट पाणी प्यावे. थंड पेय व फास्ट फूड टाळण्याचा आणि नैसर्गिक द्रवपदार्थ (जसे की ताक, लिंबूपाणी) घेत राहण्याचा सल्ला दिला आहे.

बाहेर जाणे आवश्यक असल्यास डोकं झाकणं, हलके आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणं, आणि अंगावर थेट सूर्यप्रकाश येऊ न देणं आवश्यक आहे. यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात संरक्षण होऊ शकते.

पुढील काही दिवस सावधगिरी बाळगा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तापमान आणखी काही दिवस असेच उच्च राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि शक्यतो गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें